
केळये येथील खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ रत्नसिंधू समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले
रत्नागिरी :मजगांव केळये पुलाजवळच्या खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य किर्केट संघटनेचे उपाध्यक्ष आणि रत्नसिंधू समितीचे सदस्य किरणशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना तालुका प्रमुख बाबूशेठ म्हाप, मजगांव, केळये ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ, म्हमूरवाडी येथील शिवसेना कार्यकर्ते, मजगांव येथील ग्रामस्थ, जमातुल मुस्लिमीन कमिटी मजगांवचे सदस्य तसेच माहिगीर मोहल्ला, शीतपवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. मजगांव पुलाजवळच्या खाडीत गाळ साचल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी भरून शेती नापीक झाली होती. तसेच विहिरीचे पाणीही मचूळ झाले होते. तसेच येथे पावसाळ्यात पाणी भरत असल्याने वाहतूक ठप्प होत होती.

सदरचा गाळ काढण्यासाठी मजगांव सरपंच फैयाज मुकादम यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, यांच्याकडे पाठपुरवठा केला होता. अखेर या कामाला मंजुरी देउन सदर ठिकाणीचे गाळ काढण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत. या भागातील ही मोठी समस्या दूर झाल्याने ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मजगांव, केळये, सरपंच यांनी मानले आहेत.